Episodes
-
गेली पाच वर्षे महाराष्ट्राने अभूतपूर्व अशा राजकीय घडामोडी, उलथापालथी अनुभवल्या आहेत.
-
लोकप्रिय नेते सुरेशदादा जैन यांची राजकीय कारकीर्द घरकुळ घोटाळ्यामुळे संपुष्टात आली.
-
Missing episodes?
-
कोरोनाशी दोन हात करतानाही पोळ्यासाठी शेतकऱ्यांनाउस बिलाचा हप्ता वेळेत देण्याची काळजी पंतांनी घेतली होती.
-
वंदना चव्हाण, दीप्ती चवधरी, कमल व्यवहारे, राजलक्ष्मी भोसले, रजनी त्रिभुवन यांनी महापौरपदाला वेगळा आयाम दिला.
-
भाजपच्या अमृत पवार यांनी मंत्री छगन भुजबळ यांच्याकडून आपल्या वडिलांना झालेल्या त्रासाची परतफेड करण्यासाठी येवला मतदारसंघात जम बसवण्यास सुरू केली आहे. त्यामुळे भुजबळ यांच्या अडचणींत वाढ झाली आहे.
-
1999 च्या निवडणुकीत औरंगाबाद मतदारसंघात माजी मुख्यमंत्री ए. आर. अंतुले यांची लढत चंद्रकांत खैरे यांच्याशी झाली होती. हा मतदारसंघ शिवसेनचा बालेकिल्ला असला तरी मुस्लिमांची संख्या लक्षणीय आहे. बाहेरुन आलेले अंतुले वरचढ ठरतील अशी भीती काही काँग्रेस नेत्यांना होती.
-
संजयकाकांच्या जोडीला कोणीही बडा नेता नसताना आबाविरोधक म्हणून ते राज्यभरात चर्चेत आले. आबांच्या विरोधात मिळत असलेल्या प्रसिद्धीने संपूर्ण राज्याचं लक्ष तासगाव मतदारसंघाकडं लागलं होतं. स्वच्छ प्रतिमा असलेल्या आबांना हिसका दाखवण्यासाठी राज्यातील काही काँग्रेसच्या नेत्यांनी संजयकाकांना रसद पुरवली. त्यामुळं आबा स्वतःच्या मतदारसंघात अडचणीत आले…काय घडलं होतं त्यावेळी !
-
महाराष्ट्राच्या राजकारणात ५६ वर्षांपासून शिवसेना नावाचे वादळ नेहमीच घोंगावत राहिले. या वादळात अनेकजण तरले तर अनेकजण फसलेही पण शिवसेनेची साथ सोडून घरोबा बदलणाऱ्या भल्याभल्या नेत्यांना या वादळाने घरी बसवून चांगलीच अद्दल घडवली.
-
नशिबात नसलं तर समोर आलेलंही हाती लागत नाही असं काहीसं माजी मंत्री सुबोध मोहितेंबाबत झालंय….एक विमान चुकल्यानं त्यांची विधान परिषदेची आमदारकी गेली आणि तेव्हापासून त्यांचं नशिब त्यांना सतत हुलकावण्या देतं….
-
पुण्याच्या राजकारणातील ‘भाई’ म्हणजेच सुरेश कलमाडी यांना ‘क्लीन बोल्ड’ करणारा नेता ते राजकारणात सक्रिय असेपर्यंत तरी दुसरा कुणी नव्हता. 1995 ते 2007 या काळात काँग्रेसकडं कलमाडींशिवाय दुसरा चेहरा नव्हता. सुरेश कलमाडींची ताकत इतकी होती की त्यांच्या शब्दापलीकडे कुणीही जात नसत. शहरातील काँग्रेसचे पदाधिकारी, नगरसेवकांचा त्यांच्या समोर थरकाप उडायचा. पण भ्रष्टाचाराचे आरोप झाले अन् भाईंच्या राजकारणाला उतरती कळा लागली
-
बाळासाहेबांच्या विचारधारेबाबत मतमतांतरे असू शकतात. मात्र बाळासाहेबांनी सत्तेची गंगा सामान्यांच्या दारात पोहोचवली, हे कुणीही नाकारू शकत नाही. काँग्रेसच्या सरंजमी वृत्तीच्या नेत्यांसमोर सामान्यांचे काहीएक चालत नसतानाच्या काळात बाळासाहेबांनी अगदी सामान्यांतील सामान्य लोकांना सत्तेची पदं दिली. त्यांना आमदार, खासदार आणि मंत्री बनवले
-
सतत धावणाऱ्या, अहोरात्र जागणाऱ्या, आणि सतत काही ना काही घडणाऱ्या मुंबईत दोन नावं घेतली, की आजही लोक क्षणभर थबकतात. जुन्या पिढीतल्या लोकांना सगळे संदर्भ आठवतात, आणि नव्या पिढीची उत्कंठा आणखी वाढत जाते. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि दाऊद इब्राहिम या दोन ध्रुवांवरच्या दोन माणसांनी त्यावेळी मुंबई व्यापली. तो काळ मुंबईच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्र आणि देशभरातही धडकी भरवणारा तुफान वादळी ठरला
-
सध्या सगळीकडं अमूक नेत्याची ईडीकडून चौकशी झाली....तमूक नेता ईडी कार्यालयात हजर झाला. यांची चौकशी होणार, त्यांच्यावर ईडीने कारवाई केली, असे अनेक शब्द नेहमीच ऐकावयास मिळतात. त्यामुळे नेमकी ईडी म्हणजे काय?, त्याचे कार्य कसे चालते, या बद्दल सर्वांनाच उत्सुकता आहे.
-
सुशीलकुमार शिंदे यांच्या पहिल्या निवडणुकीवेळी ज्या शरद पवारांनी साथ दिली त्याच शरद पवारांना मला माझ्या शेवटच्या निवडणुकीत साथ द्या म्हणून भावनिक साद घालण्याची वेळ सुशीलकुमार शिंदे यांच्यावर आली. अखेर पराभवाचा ठपका घेऊनच शिंदे यांच्या राजकारणाला लागलेली घरघर 24 ऑक्टोबर 2023 रोजी निवडणुकीच्या राजकारणातील निवृत्तीच्या घोषणेत परावर्तीत झाली. याद्वारे एका हसतमुख राजकीय व्यक्तीचे राजकारणच जणू थांबल्यासारखे झाले आहे
- Show more