Эпизоды
-
सर्वाधिक ११ वेळा लोकसभेवर निवडून गेलेल्या सीपीआयचे इंद्रजित गुप्ता केंद्रीय गृहमंत्री असताना दोन खोल्यांच्या घरात राहायचे.
-
गुलझारीलाल नंदा हे दोनवेळा काळजीवाहू पंतप्रधान झाले, गृहमंत्री झाले. त्यांनी आयुष्यभर गांधीजींच्या विचारांवर मार्गक्रमण केलं.
-
Пропущенные эпизоды?
-
प्रामाणिक आणि सर्वसामान्यांचा नेते अशी किसनराव बाणखेले अण्णा यांची ओळख होती.
-
गोपीनाथ मुंडे यांच्या निधनाच्या दहा वर्षांनंतरही मराठवाडा नेतृत्वाच्या दृष्टीने पोरकाच राहिला आहे.
-
प्रमोद महाजन यांनी संघटनकौशल्याच्या बळावर भाजपमध्ये आपलं अढळ स्थान निर्माण केलं होतं.
-
जॉर्ज फर्नांडीस विद्रोही होते. त्यांचा जीवनप्रवास अत्यंत संघर्षमय होता.
-
राजीव सातव हे नव्या पिढीतील सभ्य, आश्वासक चेहरा होते. यांनी कमी वेळेत कळमनुरी ते दिल्ली अशी मजल मारली होती.
-
डोक्यावरून महिलांचा पदर ढळायला भाग नसे, त्या काळात केशरकाकू राजकारणात सक्रिय झाल्या.
-
गेली पाच वर्षे महाराष्ट्राने अभूतपूर्व अशा राजकीय घडामोडी, उलथापालथी अनुभवल्या आहेत.
-
लोकप्रिय नेते सुरेशदादा जैन यांची राजकीय कारकीर्द घरकुळ घोटाळ्यामुळे संपुष्टात आली.
-
कोरोनाशी दोन हात करतानाही पोळ्यासाठी शेतकऱ्यांनाउस बिलाचा हप्ता वेळेत देण्याची काळजी पंतांनी घेतली होती.
-
वंदना चव्हाण, दीप्ती चवधरी, कमल व्यवहारे, राजलक्ष्मी भोसले, रजनी त्रिभुवन यांनी महापौरपदाला वेगळा आयाम दिला.
-
भाजपच्या अमृत पवार यांनी मंत्री छगन भुजबळ यांच्याकडून आपल्या वडिलांना झालेल्या त्रासाची परतफेड करण्यासाठी येवला मतदारसंघात जम बसवण्यास सुरू केली आहे. त्यामुळे भुजबळ यांच्या अडचणींत वाढ झाली आहे.
-
1999 च्या निवडणुकीत औरंगाबाद मतदारसंघात माजी मुख्यमंत्री ए. आर. अंतुले यांची लढत चंद्रकांत खैरे यांच्याशी झाली होती. हा मतदारसंघ शिवसेनचा बालेकिल्ला असला तरी मुस्लिमांची संख्या लक्षणीय आहे. बाहेरुन आलेले अंतुले वरचढ ठरतील अशी भीती काही काँग्रेस नेत्यांना होती.
-
संजयकाकांच्या जोडीला कोणीही बडा नेता नसताना आबाविरोधक म्हणून ते राज्यभरात चर्चेत आले. आबांच्या विरोधात मिळत असलेल्या प्रसिद्धीने संपूर्ण राज्याचं लक्ष तासगाव मतदारसंघाकडं लागलं होतं. स्वच्छ प्रतिमा असलेल्या आबांना हिसका दाखवण्यासाठी राज्यातील काही काँग्रेसच्या नेत्यांनी संजयकाकांना रसद पुरवली. त्यामुळं आबा स्वतःच्या मतदारसंघात अडचणीत आले…काय घडलं होतं त्यावेळी !
-
महाराष्ट्राच्या राजकारणात ५६ वर्षांपासून शिवसेना नावाचे वादळ नेहमीच घोंगावत राहिले. या वादळात अनेकजण तरले तर अनेकजण फसलेही पण शिवसेनेची साथ सोडून घरोबा बदलणाऱ्या भल्याभल्या नेत्यांना या वादळाने घरी बसवून चांगलीच अद्दल घडवली.
-
नशिबात नसलं तर समोर आलेलंही हाती लागत नाही असं काहीसं माजी मंत्री सुबोध मोहितेंबाबत झालंय….एक विमान चुकल्यानं त्यांची विधान परिषदेची आमदारकी गेली आणि तेव्हापासून त्यांचं नशिब त्यांना सतत हुलकावण्या देतं….
-
पुण्याच्या राजकारणातील ‘भाई’ म्हणजेच सुरेश कलमाडी यांना ‘क्लीन बोल्ड’ करणारा नेता ते राजकारणात सक्रिय असेपर्यंत तरी दुसरा कुणी नव्हता. 1995 ते 2007 या काळात काँग्रेसकडं कलमाडींशिवाय दुसरा चेहरा नव्हता. सुरेश कलमाडींची ताकत इतकी होती की त्यांच्या शब्दापलीकडे कुणीही जात नसत. शहरातील काँग्रेसचे पदाधिकारी, नगरसेवकांचा त्यांच्या समोर थरकाप उडायचा. पण भ्रष्टाचाराचे आरोप झाले अन् भाईंच्या राजकारणाला उतरती कळा लागली
- Показать больше